Monday 3 April 2017

जीवाची किंमत!

जीवाची किंमत!


आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्राण्यांवर होणार्‍्या अत्याचारांची बातमी वाचली आणि धक्काच बसला. प्राण्यांवर अत्याचार होतात, त्यांना अकारण दुष्टतेने वागवले जाते हे वेळोवेळी वाचनात येते; परंतु या गुन्ह्यासाठी दंड हा केवळ 50 रूपये, किंवा जास्तीत जास्त 100 रूपये होऊ शकतो हे वाचून मात्र खूपच धक्का बसला.

प्राण्यासाठी काम करणार्‍्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहे कि प्राण्यांच्या अधिकारांबाबत सामान्य जनांमध्ये जाणीव करून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी पोस्ट्स लिहिल्या गेल्या पाहिजेत कारण बहुतेक कोणालाच हे माहीत नसते कि प्राण्यांनाही हक्क असतात, परंतु त्यांच्या विरूध्द केल्या गेलेल्या गुन्ह्यांना मात्र इतका कमी, नाममात्र दंड असतो. ही शरमेची गोष्ट आहे पण मला कबूल करायला हवे कि मला देखील हे माहीत नव्हते कि जनावरांना छळणारे दुष्ट इतक्या सहजा सहजी, इतक्या कमी पैशावर सुटून जाऊ शकतात.

Image result for images of stray animals

हे असे का? प्राण्यांना जीव नसतो? त्यांना दुखापत, वेदना होत नाहीत? त्यांना बोलता येत नाही, ते कोणत्याही कोर्टात जाऊन केस करू शकत नाहीत व अपराध्यांना सजा देववू शकत नाहीत – केवळ या कारणांमुळे त्यांच्यावर अत्याचार करणारे गुन्हेगार इतक्या सहजपणे सुटून जाऊ शकतात? म्हणजे त्यांच्या जीवाची काही किंमतच नाही?
अतिशय बाईट गोष्ट आहे ही!

आजकालच्या जमान्यात तर 50 रूपये कोणीही हसत हसत अगदी गटारातही फेकू शकतात. सर्वांच्याच, अगदी मुलांच्या हातातही इतके पैसे, इतका पॉकेटमनी असतो कि 50 रूपये द्यायला लागले तर कोणालाही त्याचा जराही पिंच जाणवणारही नाही, शाळकरी मुलांनाही नाही जाणवणार. तेव्हा कोणीही हाच विचार करेल ना कि थोडी मजा करू, lets get some kicks (People find fun in troubling some innocent, dumb animals who cannot protest? How sadistic humans can get?) थोडं सतावू जनावरांना, गंमत! कोणी पकडलेच तर जास्तीत जास्त काय होईल? 50 रूपयेच भरावे लागतीला ना? भरू! त्यात काय मोठसं!

बातमीमध्ये हेही लिहिले होते कि जी व्यक्ती सतावत होती त्याला लहान मुले टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. यावरून कल्पना करावी कि मुलांना काय शिकवले जात आहे. का हे पालक मुलांना शिकवत नाहीत कि प्राणीही आपल्यासारखे जीवच असतात, त्यांना त्रास देऊ नये; का हे पालक आपल्या मुलांना ही जाणीव करून देत नाहीत कि दुसर्‍्या कोणत्याही जीवाला सतावणे हे योग्य नाही, आपल्यासारख्याच त्यांनाही वेदना होतात. मी तर हे नेहमीच म्हणते कि लहानपणापासून मुलांच्या मनावर या गोष्टींचे महत्त्व बिंबवायला हवे, तरच पुढल्या पिढीमध्ये ही मनोविकारी क्रूरता कमी होईल.

पण या मूक प्राण्यांच्या जीवाची किंमत इतकी नगण्य ठरवली गेली तर कोण कशाला ध्यान देईल? जर हा दंड कमीत कमी 500 किंवा 1,000 रूपये असेल, तर आपल्या मजेसाठी प्राण्यांवर हात उगारण्याआधी हे दुष्ट थोडा तरी विचार करतील. तेव्हा या मुक्या जनावरांचे आयुष्य हे शासनाच्या व न्यायप्रणालीच्या हाती आहे

Image Source: Here

Thursday 23 March 2017

माझे लेखन……

माझे लेखन……

23 मार्च 2017
आत्ता या क्षणी, मला असे वाटते कि माझे लिखाण, विशेषतः ब्लॉग लेखन हे एका दो-रस्त्यावर येऊन ठेपले आहे, अडकले आहे. कुठला रस्ता निवडावा हे कळत नाही आहे.

माझ्या पध्दतीचे लिखाण म्हणजे साधं सुधं, एकतर माझ्या पूर्वानुभवांविषयी किंवा सद्य स्थितीविषयी काही अचानक सुचले किंवा त्या विषयाचा माझ्याशी काही संबंध असला तर त्याविषयी. पण माझा ब्लॉग्जविषयीचा अभ्यास सांगतो कि या प्रकारच्या लिखाणाला ग्राहक नाही. कोणाला त्यात इंटरेस्ट नाही, कोणी तिथे पाहातही नाही. प्रवास, फॅशन, फोटोग्राफी, हाय फाय या विषयीचे ब्लॉग्ज अतिशय डिमांडमध्ये असतात. ते तर आपण लिहू शकत नाही.

दुसरी नवीन ट्रेंड आली आहे ती सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर काही (खर तर, काहीही) लिहायचे. सगळ्यात गरमागरम टॉपिक्स म्हणजे स्त्री-मुक्ती, स्त्री-शक्ती, स्त्रीवर अत्याचार, स्त्री विषयी लिंगभेदाची वागणूक वगैरे वगैरे वगैरे……… कुठलीही बातमी घ्या, तिला मोडून तोडून, कसंही करून या मधील एका टॉपिकमध्ये फिट्ट् बसवा आणि पेश करा. झाली एक गरम, ताजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अगदी पॉप्युलर पोस्ट, तयार.

माझ्या साध्यासुध्या पोस्ट्स ना कोणी विचारत नाही, तेव्हा असा विचार केला कि जे डिमांडमध्ये आहे ते लिहून पाहावे. प्रथम तसे लिहिणे जमते का हेच पाहायला हवे. म्हणून प्रयत्न केला. केवळ एकच नव्हे तर तश्या धर्तीवर तीन-चार पोस्ट्स लिहून तयार केल्या. ठीकठाक जमल्या असे वाटले. अर्थात माझे स्वतःचे लिखाण मला ठीक वाटणारच. त्यापैकी एक पोस्ट केली.

मी सहसा स्वतःहून विचारायला जात नाही, पण मुलाने स्वतःच पोस्ट वाचल्याचे सांगितले तेव्हा विचारले कि या प्रकारचे लेखन कमर्शियल, म्हणजे केवळ अधिक पॉप्युलॅरिटीसाठी लिहिले असे वाटते का? त्याने उत्तर दिले कि अगदी तसेच नाही, पण थोडे कमर्शियल वाटते. त्याने अडखळत कबूल केले म्हणजे तसे कमर्शियलच वाटत असणार. मग तसे लिहिण्यामागचे माझे कारण सांगितले कि साध्या पोस्ट्स कोणी वाचत नाही.

त्यावर त्याने विचारले, तू स्वतःसाठी लिहितेस का इतरांसाठी? आपल्याला जसे आवडते, लिहावेसे वाटते तसेच लिहावे, दुसर्‍्यांची वाहवा मिळवण्यासाठी का धडपड करावी? मला कोणी काही म्हंटले कि लगेच पटते, तसेच हेही बरोबरच वाटले. स्वतःला हवे तसेच लिहावे नि लिहिण्याचा आनंद घ्यावा.

पण ह्यामध्ये दुसराही मुद्दा आहे. शेवटी कोणीही लिखाण करतात ते दुसर्‍्यांनी वाचावे यासाठी. जर कोणी वाचलेच नाही तर माझे लिखाण माझ्यापुरतेच राहील. तसेही मी जे काही लिहिते ते सर्वांपर्यंत पोहोचावे कि नाही हे अगोदरच माझ्या हाती नाही. अजूनही सर्वांपर्यंत पोहोचत नसावे, पण तो प्रश्न वेगळाच आहे.

मी अगदी नेमाने सर्वांना लाईक करते, व्होट करते. जे कोणीही मला व्होट करतील त्यांना पुढेही व्होट करतच राहाते. पण मला परतून तितकाच प्रतिसाद काही मिळत नाही. खरं तर याला कितपत अर्थ आहे, मी लाईक केल्यानंतर समोरच्याने लाईक करायचं – केवळ कर्टसी म्हणून. खरोखर कोणी वाचतात की नाही, हे कसं कळणार? व्होट चं ही तसंच, मी व्होट करेन तरच व्होट मिळणार, बरेच वेळा तर ते ही नाही.

याला लेखन म्हणायचं? काय किंमत / व्हॅल्यू आहे अश्या लिखाणाची? काही जणं, जो मिळेल त्या सर्व ब्लॉग्जना लाईक / व्होट / कमेंट करतात, त्यांना प्रतिसाद म्हणून तितक्या सर्वाकडून लाईक्स / व्होट्स मिळत जातात आणि त्यांच्या पोस्ट्स टॉप पोस्ट्स – काही काहींच्या पोस्ट्स तर अगदी चक्क भिकार असतात. तरीही टॉप ! तर अश्या या टॉप पोझीशन साठी आपण मारामारी, धडपड करायची? जे विकतं तेच लिहायचं?


तेव्हा प्रश्न फक्त हाच आहे कि लिहायचं तर काय लिहायचं? आणि त्या टॉप च्या जागेसाठी धडपड करायची का नाही? आपल्या मनासारखं लिहायचं आणि त्यातच खुशी मानायची? का सर्व लोकं जसं लिहितात आणि जे हॉट टॉपिक समजलं जातं ते लिहायचं? टॉपला पोहोचणार्‍्या काही पोस्ट्स पाहून तर या टॉप पोझीशनला काही अर्थही आहे का असाच प्रश्न पडतो. मग का करायचा आटापिटा? काहीच कळेनासं होतं. याला लेखन म्हणायचं का व्यापार – देवाणघेवाण? मी लिहायचं काय नि करायचं काय? सगळ्याच गोष्टींची दुविधा – Dilemma. 

Wednesday 8 March 2017

पतंगा

In all our literature, be it Shayari or Poetry,  a Patangaa or Parwana is always glorified as the one sacrificing itself on the Shama. But did anyone bother to ask the Patangaa whether it wants to burn itself; whether it does this sacrifice by his own choice? 
May be the Patangaa has many more aspirations, many wishes he wants to fulfill, but has no other go, it is destined to end its life on the flame.

Today, on the International Woman's Day, this is a  tribute to the quintessential woman, who is glorified to the skies, especially on the Woman's day; but no one bothers to ask what she really wants. whether she really wants to be the sacrificial martyr or whether she has dreams and aspirations of her own. Probably she is chained to this vicious cycle that the destiny has dumped on her -- and against her wish, the woman has to go on --- just like a Patangaa..........


पतंगा  

   Image result for images of shama - parwana


नजर झाली त्याची स्थिर, त्या उंच मोकळ्या आभाळावर
होई त्याचेही मन, घ्यावी गरूडभरारी पवन झूल्यावर

वाटे त्यास, शक्ती हवी दुबळ्या पंखांत झेप घ्यावया आभाळी
त्याहूनी अधिक, बळ हवे मनात तोडून द्याया पायीची साखळी

जखडले-बांधले नियतीने त्यास या शमे सवे
हेच का त्याचे प्राक्तन कि येथेच जळावे

आस मनी असो कितीही दूरीची,
पण जीवन-मरण त्याचे याच शमेवरी

किती मोहक ती फुले   -----    ती फुलपाखरांसाठी
किती उंच उंच तरूवरे  -----   ती त्या विहंगांसाठी
गगनी लक्ष लक्ष तारका -----  त्या असती मेघांसाठी
आणि तो अतिरम्य चांदवा ----- तो केवळ चकोरासाठी

असतील अगणित मनोहर नजारे या जगी,
परि पतंगास काय त्याचे – ठरले तेच त्याच्या नशिबी
कितीही धावले मन अष्ट-अष्ट दिशांस,
तो नव्हता सोडू शकत अपुल्या चाकोरीस

हे मनमोहक विश्व सारे नव्हते तया साठी

शमेवर जळून संपणे एवढेच होते नशिबी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Friday 24 February 2017

कोमेजली ती फुले

कोमेजली ती फुले.............



Image result for images of flowers









  






 होती ती ही नाजूक  मनोहारी             
 उगवत्या दिनासवे मोहक हसणारी
स्वप्न-नगरीत अपुल्याच रमणारी
नित्य नव्या नादात गुणगुणणारी
          
            समजावले सार्‍्यांनी, दिली चेतावणी
            स्वप्न नसते सदासाठी, हो जरा जागी
            जीवन नसते पायघडी मखमाली
            येईल तूफान, होईल ताप भयकारी

हसली ती फुले मनमुराद
होती दवबिंदूंची रम्य ती साथ
झुळूक सवे वार्‍्याची ती मंजूळ
तीच ती भोळी स्वप्ने नयनात

            ना लागली चाहूल, ना जाणे आले कुठूनी
            कधी आला झंजावात, कधी वारा वादळी
            कधी बरसला अतिताप, ग्रीष्म असह्य अविरत
  तर कधी वर्षाव पर्जन्याचा, होई महापूर

उध्वस्त करून गेले ते ती मानस-नगरी
गेले विरूनी, राहिली केवळ स्वप्न-स्मृती
गोंधळली, बाबरली पाहूनी हे रूप जीवनाचे
कोमेजली ती फुले जाणूनी कटूसत्य नियतीचे                          




Image result for images of withered flowers



















आधुनिक युगाचे वायरमन

आधुनिक युगाचे वायरमन

जसजसे दिवस पालटतात, तश्या किती तरी गोष्टी बदलत जातात, नाही का? आता प्रवासाचीच गोष्ट घ्या ना.

पूर्वौ प्रवासाला निघायचे म्हणजे सर्वप्रथम होल्डॉल बाहेर काढून, साफसूफ करून बांधायच्या तयारीला लागायचे. आताच्या मुलांना तर प्रश्न पडेल, (' दारू म्हणजे रे काय, भाऊ' च्या चालीवर) 'होल्डॉल म्हणजे रे काय, ब्रो?' त्यांना तो बहुधा पुराण वस्तूसंग्रहालयात (आता ही आणखी कुठली वा कोणत्या ग्रहावरची जागा?) जाऊन पाहायला लागेल. त्या एका बोजड दिसणार्‍्या वस्तूच्या पोटात काय काय मावत असे -– झोपण्यासाठी अंथरायच्या–पांघरायच्या चादरींपासून ते बारीक सारीक कपडे, टॉवेल्स किंवा अगदी फणी-कंगवेसुध्दा.


साबणाची डबी, टॉवेल, टूथब्रश-पेस्ट अश्या गोष्टी आठवणीने सुटकेसमध्ये ठेवाव्या लागत. …..आता त्यांची गरजच नसते. बहुतेक सर्वच हॉटेल्समधून तुम्हाला या गोष्टी आधीच पुरवल्या जातात – अगदी केसांचा शँम्पू, बॉडी लोशन्ससुध्दा. म्हणजे प्रवासाची बांधाबांध सोपी झाली, नाही का?

पण तसंच काही नाही, हं. ज्याप्रमाणे बर्‍्याचश्या गोष्टी सोबत नेण्याची गरज उरली नाही, त्याचप्रमाणे दुसर्‍्या बर्‍्याचश्या गोष्टी आठवणीने नेण्याची आवश्यकताही निर्माण झाली आहे.


आता स्मार्टफोन तर सततच हाताला (किंवा कानाला) चिकटलेलाच असतो, तेव्हा तो सोबत न्यायलाच हवा. आजकाल बर्‍्याच जणांचा प्रवास हा ऑफिसच्या कामानिमित्ताने असतो. आणि अगदी जरी 'केवळ पर्यटना'साठी घराबाहेर पडले, तरीही ऑफिसचे काही ना काही काम शेपटीसारखे पाठीमागून आपल्याला चिकटून येतच असते. म्हणजे त्यासाठी लॅपटॉप सोबत नेणे आलेच. (कारण, फोन कितीही 'स्मार्ट' असले तरी सारी ऑफिसची कामे त्यावर होणे शक्य नसते).

मग हे स्मार्ट फोन्स, लॅपटॉप्स हवे, तर त्यांच्या चार्जर वायर्सही सोबत हव्याच. फोन्ससाठी बहुधा कोणत्याही अन्य स्मार्टफोनचा चार्जर चालू शकतो. पण आपण हा चान्स घेऊ शकत नाही ना; समजा वेळेवर कुणाचा नाही मिळाला चार्जर किंवा हॉटेलने पुरविलेला नाही फिट् झाला, मग? आली का पंचाईत? त्यापेक्षा आपलाच फोन चार्जर न्यावा हे बरे. त्याशिवाय, फोनवर 'म्यूझिक' ऐकणे हे तर अत्यावश्यक. मग त्यासाठी इयरफोन्स नकोत का? अजून एक वायर.

लॅपटॉपसाठी मात्र चार्जर जरूरच आहे; मला वाटतं प्रत्येक कंपनीचे चार्जर्स वेगवेगळे असतात. म्हणजे ते एक अजून अवजड वायरचे भेंडोळे. त्यात पुन्हा, गणपतीबाप्पांचे जसे त्यांच्या उंदराविना चालत नाही, तसेच जर तुम्हालाही लॅपटॉपसाठी उंदीरमामाची (माऊस) गरज पडत असेल तर तो मूषक आणि त्याचबरोबर त्याची लांब शेपूट! आता वायरलेस उंदीरही मिळतात म्हणा, पण निदान ते एक उपकरण तरी वाढलेच ना!

तशात अलिकडे लहान-थोर सर्वांना वेळ घालविण्याचे साधन म्हणून (किंवा कधी कामासाठीही) टॅब्लेट लागतातच. लहान मुलांच्या हातात गोष्टींच्या पुस्तकांऐवजी गेम्स खेळण्यासाठी टॅब्लेट्स दिले असतात. मग त्यासोबतही त्याची आयुधं लागणारच. त्यात पुन्हा तुम्ही जिथे जाणार तिथे वायफाय असेलच अशी खात्री नसेल, तर – इंटरनेटसाठी डोंगल सुध्दा हवाच ना!

म्हणजे बाहेरगावी निघतांना सामानात ही सारी उपकरणे आणि त्यांच्या विविध वायर्स यांनीच सुटकेस भरते की! आणि प्रश्न फक्त वायर्सचा नाही. एकवेळ दुसरे काही राहून गेले तरी चालेल, पण यापैकी एकही वायर सोबर घ्यायची राहिली तर ते उपकरणच निकामी. आता यापैकी कोणतेही एक उपकरण / आयुध जरी वापरता येऊ शकले नाही, तर? अकल्पनीयच!

आता आपले आयुष्यच इतके या आयुधांवर अवलंबून असते कि – यांच्याशिवाय करणार काय? आताच्या पिढीला केवळ हा विचारही अस्वस्थ करेल. तर अश्या ह्या आमच्या अत्यावश्यक वायर्स आणि असे हे आपण आजच्या युगाचे वायरमन्स!

Image Source: Clipart.

Friday 10 February 2017

हे खरंच जरूरी आहे का?

हे खरंच जरूरी आहे का?

परवाच इथल्या बंगलोरच्या वर्तमानपत्रात एक बातमी वजा लेख वाचला – ब्रायडल ड्रेस म्हणजेच वधूच्या लग्नातील पोषाखाविषयी. वाचून मनात बरेच विचार उठले –

आता डिमॉनेटायझेसन नंतर पैशाच्या बर्‍्याचश्या व्यवहारांवर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तीन लाखांवरील एकरकमी खरेदीवर अटी / कायदे लागू. आणि त्यामुळे ड्रेस डिझायनर्सच्या व्यवसायावर गदा आली. कारण काय तर सध्याचे ब्रायडल ड्रेसेस हे एकेक सात आठ लाख किंवा त्यावरच असतात.


वधूने एका दिवसासाठी, खरं तर केवळ काही तासांसाठी घालायच्या कपड्यांची किंमत सात आठ लाख? आणि असे हे कपडे नियमितपणे, ऑन रेग्युलर बेसिस, खरेदी केले जातात? ही कल्पनाही अतिशय अश्लिल / बीभित्स व्हल्गर वाटते.

मला अतिशय मागासलेली किंवा पुराण कालातील समजले जाईल. परंतु मी अश्या खर्चाची कल्पनाच करू शकत नाही. आणि हा प्रश्न माझ्या विचारांचा नाही आहे. मुळात हा असा अवास्तव खर्च खरोखरच जरूरी आहे का?

एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलीच्या संपूर्ण लग्नाचा खर्च त्या एका ड्रेसच्या खर्चात होऊन जाईल. तसं पाहायला गेले तर त्या एका ड्रेसच्या पैशात किती तरी गरजेच्या गोष्टी होऊ शकतील – एखाद्या नडलेल्या गरीबाचं जीव वाचवणारं ऑप्रेशन होऊ शकेल, दूर खेडेगावात एखादी लहानशी शाळा सुरू करता येईल ज्यामुळे बरीच मुले शिकून साक्षर होऊ शकतील, उपाशी गोरगरीबांना जर अन्न दिले तर त्या तेवढ्या लाखांमध्ये किती भुकेल्यांची पोटे भरतील सांगा बरं? अनाथालयांना देणगी देता येईल, इस्पितळाच्या बालरुग्ण विभागामध्ये सुधारणा-मदत करता येईल….. पर्याय, गरजा असंख्य आहेत. आपला देश व परस्थिती अशी आहे कि जितकं करावं तितकं थोडंच.

मग अशी परिस्थिती असतांना काही तासांसाठी इतका खर्च करणं हे योग्य आहे का? जी वधु तो पोषाख घालणार तिच्याही मनात एकदाही हा विचार येतच नाही का कि केवळ माझ्या हौसे साठी मी लाखो रूपये खर्च करणार तेच कुणा गरजवंताच्या कामी येऊ शकतात …..आणि कितीही म्हंटले तरी असे भारी कपडे पुन्हा वापरणे कठीणच असते. फार तर फार अगदी घरातल्या लग्नांमध्ये घातले जातील, पण त्यासाठीही सख्खी भावंडे जेमतेम एक किंवा दोन. त्यावेळीही तो लग्नातला ड्रेस घातला जाईलच असे नाही. म्हणजे पडूनच राहणार? तेवढ्यासाठी इतका खर्च?

आपली मानव जात इतकी का स्वार्थी होत चालली आहे, कि स्वतःच्या हौशीमौजीपुढे काहीच सुचत नाही? विचारांचं जराही तारतम्य राहात नाही? खर्च करणार्‍्यांचं यावर एकच उत्तर असतं – लग्न आयुष्यात एकदाच होतं (तसं पाहिलं तर हे ही आता तितकंसं खरं नाही) मग लग्नात नाही तर केव्हा करणार हौस? करावी हौस, पण त्यावरही काही स्व-विचारांनी घातलेल्या मर्यादा नको का? इतक्या पैशांचा चुराडा ….. त्याऐवजी तेच पैसे जर कुणा गरजूंना दिले तर आयुष्यभरासाठी त्यांचे आशीर्वाद नाही का मिळणार?

पण असे हे विचार कुणाला रूचणार? कुणी ऐकायलाही तयार होणार नाही. सर्व जगच धावतयं पैशांच्या पाठी, बरं-वाईट, योग्य-अयोग्य कोण पाहात बसलंय? आजकाल या 'मी'ला फार महत्त्व आले आहे, आपल्याला काय हवे ते करावे, दुसरे गेले उडत. यालाच पूर्वी स्वार्थीपणा म्हणत; आता अ‍ॅटिट्यूड म्हणतात – अन् तो तर अति आवश्यक!



(त्या डिझायनर ड्रेस वाल्यांनी आपल्या व्यवसायासाठी व्यवस्थित पळवाट शोधून काढली – एकाच ड्रेसला तीन वेगवेगळ्या भागात बिभागून तीन वेगळी बिल्स करायची. म्हणजे लेहेंग्याचे तीन लाख, ब्लाउझचे अडीच आणि ओढणीचे अडीच लाख. म्हणजे सर्व बिल्स ही तीन लाखांच्या खालीच आणि पूर्ण पोषाखाचे संपूर्ण पैसेही वसूल. व्वा! याला म्हणतात धंदा!)

Monday 30 January 2017

प्रथा अन् व्यथा

   

प्रथा अन् व्यथा

नुकताच संक्रांतीचा सण होऊन गेला. मकर संक्रांतीचा सण म्हणजे तिळगुळ, हळदीकुंकू, सुवासिनींना वाण ---- ह्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्या अनुषंगाने काही विचार मनात आले ……